Life of Stories

# 1790: मेरा तेरा मनुओं कैसे इक होई रे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

दुसऱ्या दिवशी भल्या सकाळीच सर्वजीत बैलावर आपली ग्रंथ संपदा लादून काशीच्या दिशेने निघाला व यथावकाश कबीरांच्या घरी पोहोचला. आपल्या येण्याचं प्रयोजन त्याने कबीरास सांगितले व लगेचच आपण वाद सुरू करू म्हणाला. कबीर म्हणाले की "मी एक अडाणी, गावंढळ माणूस आहे. वाचणं लिहिणं मला येत नाही. त्यामुळे वाद सुरू करू नकोस. मी आधीच हरलोय".